शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

‘वॉटर कप’मध्ये सातारा एक पाऊल पुढे ! तीन तालुक्यांत ग्रामसभा ,पुढीलवर्षी १०० च्यावरती गावांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:45 IST

सातारा : वॉटर कप स्पर्धेच्या तिसºया टप्प्याची तयारी सुरू असून, पुढील वर्षीही सातारा जिल्ह्याचे ‘एक पाऊल पुढे’ राहणार आहे.

सातारा : वॉटर कप स्पर्धेच्या तिसºया टप्प्याची तयारी सुरू असून, पुढील वर्षीही सातारा जिल्ह्याचे ‘एक पाऊल पुढे’ राहणार आहे. त्यासाठी समन्वयक जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यांतील गावोगावी ग्रामसभा घेत आहेत. पुढील स्पर्धेत किमान १०० च्या वरती गावांचा सहभाग राहणार आहे. वेळू, भोसरे, बिदालप्रमाणेच जिल्ह्यातील इतर गावेही राज्यात डंका वाजवतील, अशाप्रकारे नियोजन सुरू झाले आहे.गेल्या वर्षीपासून राज्यात अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्यावर्षी या स्पर्धेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सातारा, बीड आणि अमरावती हे तीन जिल्हे या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये सातारा जिल्ह्यानेच अंतिम बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला होता. कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने हा क्रमांक पटकावला होता. यावर्षीच्या दुसºया स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे उतरले होते. तर ३० तालुक्यांतील सुमारे १ हजार २०० हून अधिक गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.सातारा जिल्ह्याने दुसºया वर्षीही मोठ्या प्रमाणात व सक्रिय असा सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील ९६ गावे या स्पर्धेत उतरली होती. त्यामध्ये अधिक करून माण तालुक्यातील ३२ गावांचा सहभाग होता. जवळपास या सर्वच गावांमध्ये जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. यामध्ये डीपसीसीटी, ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण, सीसीटी, वृक्षारोपणासाठी खड्डे, विहीर पुनर्भरण, माती परीक्षण, बंधारे, पाझर तलाव दुरुस्ती, गळती काढणे, नवीन नालाबांध तयार करणे आदी कामांचा समावेश होता. ४५ दिवसांच्या या कालावधीत लोकसहभाग, बाहेरील संस्था, लोकांची मदत, लोकप्रतिनिधींचे आर्थिक सहकार्य यामधून ही कामे झाली आहेत. यासाठी चाकरमान्यांनी सुटी काढून गावाला येत गावाच्या जलसंधारणाच्या कामात मोठा वाटा उचलला होता.या स्पर्धेचा अंतिम निकाल आॅगस्टमध्ये जाहीर झाला. या स्पर्धेमध्ये खटाव तालुक्यातील भोसरे गावाला दुसरा तर माण तालुक्यातील बिदाल गावाला तिसरा क्रमांक विभागून मिळाला.

सलग दुसºयावर्षीही राज्यात सातारा जिल्ह्याने डंका वाजवला. आता तिसºया वर्षीची तयारी सुरू असून, अनेक गावे त्यामध्ये समाविष्ट होणार आहेत. तिसºया टप्प्यात जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांचा समावेश आहे. त्यासाठी पाणी फाउंडेशनचे समन्वयक संबंधित तालुक्यातील गावोगावी जाऊन ग्रामसभा घेत आहे. लोकांना पाण्याचे महत्त्व सांगत आहेत. यामध्ये क्रमांक एकचे पत्र पाणी फाउंडेशनचे समन्वयक घेत आहेत. आतापर्यंत तीन तालुक्यांतील ७६ ग्रामपंचायतींकडून सहभागाचे पत्र मिळाले आहे.निवडणुकीतील विरोधक गावासाठी एकत्र...वॉटर कपमधील सहभागी तालुक्यांत ग्रामसभा सुरू आहेत. या ग्रामसभेत काही दिवसांपूर्वीच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील विरोधक एकत्र येत आहेत. गावातील जलसंधारणाच्या कामासाठी सर्व गट-तट, हेवे-दावे बाजूला ठेवून त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक गावे एक झाल्याचे चित्र पाहावयास मिळू लागले आहे.स्पर्धा दि. ८ एप्रिल ते२२ मे २०१८ याकालावधीत होणारराज्यातील २२ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांचा सहभाग राहणारस्पर्धेत सहभागघेण्याची अंतिम मुदत१० जानेवारी २०१८आतापर्यंत जिल्ह्यातून ७६ ग्रामपंचायतींचे सहभागाचे पत्रतिसºया वर्षीच्या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेत वाढ